Amravati Radha: अमरावतीत तुफान राडा! पांढरी खानमपूरमधील कमानीवरून वाद

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. 26 जानेवारीला ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन गावातील प्रवेशद्वारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्यात येईल असा ठराव पारित झाला. बांधकाम सुरू होण्यापूर्वीच 31 जानेवारीलाच लोखंडी कमान उभारून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं फलक लावण्यात आले. गावकऱ्यांनी याला विरोध केला तेव्हा 13 फेब्रुवारीला पोलिसांनी तो काढण्याचा प्रयत्न केला पण शेकडो महिला, पुरुष यांनी प्रवेशद्वारावरच आळी पाळीने ठिय्या सुरू केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola