विनामास्क ग्राहकांना सामान दिल्यास 15 दिवस दुकान बंद, औरंगाबाद महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय
औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला कुठलाही व्यक्तीस वस्तू अथवा कुलाही माल विकला तर व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या वेळेस विना मास्क व्यक्तीला वस्तू विक्रीकेल्यास 500 रुपये दंड .दुसऱ्या वेळी नियमांचं पालन केले नाही तर 7 दिवस दुकान बंद, आणि तिसऱ्या वेळी नियम मोडल्यास महिनाभर दुकान बंद केलं जाईल. या शिवाय मंगल कार्यालयाने नियमांचं पालन केले नाही तर मंगल कार्यालयही महिनाभर बंद करणार असल्याची माहिती औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे. यासाठी 70 लोकांचे पथकही तयार केले आहेत.
Tags :
No Mask Antigen Test Corona In Aurangabad Astik Kumar Pandey Aurangabad Lockdown Corona Mask Coronavirus