नवी दिल्ली : मोदी सरकारची चार वर्षे, पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची टीका

Continues below advertisement
पेट्रोल डिझेलचे आत्ताचे वाढते दर काँग्रेसच्या काळातही तीन वर्षे असेच कायम राहिले होते. भाजपाच्या काळात हे दर तीन दिवस कायम राहिले की लगेच ओरड चालू होते, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांबाबत सरकार लवकरच दीर्घकालीन धोरण घेऊन येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीच्या भाजप मुख्यालयात मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त अमित शाह यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मोदी सरकारने चार वर्षांच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत असंही शाह म्हणाले.. दरम्यान काँग्रेसकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे. चार वर्षांच्या काळात सरकारने केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram