Shivena | ऐरोली, बेलापूरची जागा भाजपला सोडली, 200 शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2019 12:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर दोन्ही मतदारसंघ भाजपाला सोडल्याने 200 शिवसेना पदाधिकार्यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर सादर केले आहेत. शहर प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांचा राजीनाम्यात समावेश आहे. बेलापूर मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी स्थानिक शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र तसं झालं नाही. विधानसभेनंतर लगेच तीन महिन्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असल्याने इथे शिवसेनेचं मोठं नुकसान होणार असल्याने शिवसैनिक नाराज आहेत.