नवी मुंबई : सलग तीन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचे हाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Dec 2017 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईकरांसाठी पुढचे तीन दिवस हार्बर रेल्वे वाहतूकही विस्कळीत असणार आहे..कारण हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते नेरुळ दरम्यान आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उरण-बेलापूर या रेल्वेमार्गाच्या कामासाठी हा तीन दिवसांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे चाकरमान्यांना स्वतःच्या वाहनानं ठाणे-मुंबई गाठावं लागणार आहे. नेरुळ ते ठाणे हा ट्रान्सहार्बर मार्ग चालू राहील. पण पनवेल ते सीवूड्स-दारावे या स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई किंवा ठाण्याला जायचं असेल तर नेरुळला यावं लागणार आहे.