नाशिक : बँकेत पडलेल्या पैशांबाबत RBI च निर्णय घेईल : सुभाष देशमुख
Continues below advertisement
नोटाबंदीच्या काळात ज्या आठ जिल्हा बँकांचे पैसे स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. त्या बँकांबाबत रिझर्व्ह बँकच निर्णय घेईल, असं सांगत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हात झटकले. नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांकडे पडून असलेले पैसे खात्री पटल्यावर रिझर्व्ह बँक नक्की परत घेईल असं देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच इंदापुरात एका खासगी कार्यक्रमात म्हटलं होतं.
Continues below advertisement