नाशिक : खासगी वाहतूकदारांचा सलग दुसऱ्या दिवशी संप, भाजीपाल्याचे दर घटले
Continues below advertisement
एकीकडे कल्याण, नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी नाशिकमध्ये वेगळे चित्र आहे. मालवाहतूकदारांच्या संपाचा शेतकऱ्यांना फटका बसू लागलाय. कारण नाशिक बाजार समितीत शेतकरी आपला शेतमाल घेऊन येतायेत. मात्र व्यापारी माल घेत नसल्याने भाजीपाला पडून राहतोय. त्यामुळे दर घसरायला सुरुवात झाली आहे. कालच्या तुलनेत आज भाजीपाल्याचे दर 10 ते 15 टक्क्याने घटले आहेत.
Continues below advertisement