नंदुरबार : राज्यात उष्णतेची लाट, नंदुरबारचा पारा 43.2 अंशांवर
Continues below advertisement
राज्यात सर्वत्र तापमानात प्रचंड वाढ होताना पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या झळांचा फटका राज्याच्या अनेक भागात दिसू लागला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार जिल्हा सध्या वाढत्या तापमानाचा बळी ठरला आहे. नंदुरबारमध्ये गेल्या 48 तासात सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात अशी वाढ झालेली दिसत असल्याने पुढचा एप्रिल आणि मे महिना किती प्रखर असेल याबाबत नागरिक चिंतेत आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला नंदुरबार जिल्हा सध्या वाढत्या तापमानाचा बळी ठरला आहे. नंदुरबारमध्ये गेल्या 48 तासात सर्वाधिक 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात अशी वाढ झालेली दिसत असल्याने पुढचा एप्रिल आणि मे महिना किती प्रखर असेल याबाबत नागरिक चिंतेत आहेत.
Continues below advertisement