नांदेड : SRPF भरतीसाठी उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये उकळले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2018 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नांदेड : पोलीस भरती घोटाळ्यात पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआरपीएफच्या भरतीमध्ये पुण्यात वानवडी येथे झालेल्या परीक्षेत 30 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका सोडवण्यात आल्याचं उघड झालं आहे.
घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली.
प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचं तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. त्यामुळे आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणी तपासासाठी काल एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक एसआयटीचे प्रमुख आहेत. तर पोलीस निरीक्षकांऐवजी आता पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी आहेत.
फरार आरोपींच्या शोधासाठी अन्य चार पथकांचीही नियुक्ती काल करण्यात आली होती.
घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने सीआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली.
प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचं तपासात समोर आलं आहे.
दरम्यान, पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. त्यामुळे आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणी तपासासाठी काल एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. अप्पर पोलीस अधीक्षक एसआयटीचे प्रमुख आहेत. तर पोलीस निरीक्षकांऐवजी आता पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी आहेत.
फरार आरोपींच्या शोधासाठी अन्य चार पथकांचीही नियुक्ती काल करण्यात आली होती.