नागपूर : मुंबईला बोलणाऱ्यांनी नागपूर मनपाचं काम पाहावं, शिवसेनेचा हल्लाबोल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूरमधील मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळात वीजपुरवठा खंडित केल्याने इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्याने विधीमंडळाचं कामकाज ठप्प झालं आहे. यानंतर शिवसेनेने सरकार आणि नागपूर महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. "हाच प्रकार मुंबईत झाला असता तर मुंबई महापालिकेबद्दल लोकांनी आक्षेप घेतला असता. आज नागपुरात हा प्रकार घडला. नागपूर उपराजधानी आहे. नागपूरमध्ये अधिवेशन असताना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर महापालिका काय करतेय," असा सवाल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला आहे.