नागपूर : फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला कृषी मंत्रालय जबाबदार : शरद पवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फवारणीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या साखळी मृत्यूला कृषि मंत्रालय जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. अमरावतीत होणाऱ्या नागरी सत्काराला उपस्थिती लावण्याआधी ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. अप्रमाणित कीटकनाशक बाजारात आल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव गेला, असाही आरोप पवारांनी केला आहे.