नागपूर : विधानपरिषद निवडणूक : दानवे आणि शेकापच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार असं चित्र असतानाच आता भाजपने 6 वा उमेदवार देत, निवडणुकीत रंगत आणलीय. सांगलीचे पृथ्वीराज देशमुख हे भाजपकडून सहाव्या जागेवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत भाजपचे पाच, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. तर 11 व्या जागेसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपने जर सहावा उमेदवार कायम ठेवला तर जयंत पाटील यांना धोका होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना भाजपच्या कोट्यातून निवडणूक लढवणारे महादेव जानकर यांनी भाजपचे सर्वच उमेदवार निवडून येतील असा दावा केलाय. तर जयंत पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोधच होईल असं म्हटलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram