नागपूर : आता राम मंदिरासाठी आंदोलन करणार नाही : प्रवीण तोगडिया

Continues below advertisement
“अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी आता कुठलेही आंदोलन करण्यात येणार नाही, कोणीही कार्यकर्ता पोलिसांची गोळी खाणार नाही, कोणी ही तुरुंगात जाणार नाही, तर राम मंदिर निर्माण करण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारची असून सरकारने संसदेत कायदा करून अयोध्येत राम मंदिर निर्माण करावे.”, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली.

अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी न्यायालयाचा निर्णयच मान्य होणार होता, तर मग यापूर्वी आंदोलन का केले, असेही तोगडिया यांनी विचारले.

राम मंदिरासंदर्भात संसदेत कायदा करावा या मागणीसाठी पंतप्रधान यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram