नागपूर : कल्याणकरांना खड्ड्यात कुणी घातलं? लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jul 2018 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कल्याणमध्ये गेल्या महिनाभरात खड्ड्यांमुळे पाचवा बळी गेलाय. खड्ड्यात बाईक आदळल्यानंतर मागून आलेल्या ट्रकखाली चिरडून तरुणाचा जीव गेल्याची घटना काल रात्री घडलीय. कल्याणच्या गांधारी पुलाजवळ हा प्रकार घडलाय. कल्पेश जाधव हा आपल्या बाईकने जात असताना त्याची बाईक खड्ड्यात आपटली. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने त्याला चिरडलं. गेल्या काही दिवसात कल्याण आणि परिसरात खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. महिनाभरात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात ५ जणांचा जीव गेलाय.