नागपूर : शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बदल, कर्जमाफी कुटुंबनिहाय नाही व्यक्तीनिहाय मिळणार
Continues below advertisement
राज्य सरकारने याआधी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीमध्ये प्रत्येक कुटुंबात एक अर्ज अशी कर्जमाफी दिली जात होती.
मात्र आजच्या सरकारच्या घोषणेनुसार आता कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक शेती कर्जदारास शेतकरी कर्जमाफी योजना लागू होणार आहे.
निकष बदलले असल्याने शेती कर्ज असलेल्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त केलेले अर्ज हे ग्राह्य धरता येतील. कुटुंबात दुसऱ्या कर्जदाराने अर्ज केला नसेल तर ते सहाय्यक निबंधाकडे अर्ज करू शकतात.
निकष बदलल्याने आता सुमारे शेतकरी कर्जदारांची संख्या सुमारे 5 लाखाने वाढणार आहे.
तर आत्तापर्यंत 38 लाख 53 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 15 हजार 771 कोटी निधी जमा झाला आहे.
मात्र आजच्या सरकारच्या घोषणेनुसार आता कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक शेती कर्जदारास शेतकरी कर्जमाफी योजना लागू होणार आहे.
निकष बदलले असल्याने शेती कर्ज असलेल्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त केलेले अर्ज हे ग्राह्य धरता येतील. कुटुंबात दुसऱ्या कर्जदाराने अर्ज केला नसेल तर ते सहाय्यक निबंधाकडे अर्ज करू शकतात.
निकष बदलल्याने आता सुमारे शेतकरी कर्जदारांची संख्या सुमारे 5 लाखाने वाढणार आहे.
तर आत्तापर्यंत 38 लाख 53 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 15 हजार 771 कोटी निधी जमा झाला आहे.
Continues below advertisement