नागपूर : मुंबई-नागपूर समृद्धी हायवेवर तब्बल 31 टोलनाके, माहिती अधिकारात बाब उघड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Dec 2017 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सत्तेत आल्यानंतर टोलमुक्ती देण्याचं फडणवीस सरकारचं आश्वासन फोल ठरल्यानंतर आता पुन्हा टोलचा बोजा वाढण्याची चिन्हं आहेत... .मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर तब्बल 31 टोलनाके उभारण्यात येणार आहेत...माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी ही माहिती समोर आणलीये...700 किलोमीटरच्या अंतरात 31 टोलनाके उभारण्यात येणार आहेत..मात्र कोणत्याही राजकीय नेत्याला याबाबत माहिती नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय.... दरम्यान यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची भेट घेणार आहेत..