मुंबई: पान-तंबाखू खाणाऱ्यांनी वाट लावली, एलफिन्स्टन पुलाची अवस्था बघा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एखाद्या चांगल्या गोष्टीची वाट लावणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशा आर्विभावात काहीजण वावरत असतात. असं आम्ही का म्हणतोय हे तुम्हाला मुंबईतील एल्फिन्स्टन स्टेशनवरचा नवा पादचारी पूल बघितल्यावर लक्षात येईल.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराने इथं तीन महिन्यांत नवा पूल उभा केला. मात्र या पुलाचे नव्याचे नऊ दिवस संपले असून इथं आपल्याला सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतंय. पान-तंबाखू खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारुन इथं अक्षरश: रांगोळी काढली आहे. दोन महिन्यातच या पूलाची काही महाभागांनी केलेली अवस्था बघून प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जातेय.