UNCUT : मुंबई : शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
जगभरातील पंतप्रधानांसोबत अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिमान वाटला असता. केवळ 56 इंचाची छाती असून उपयोग नाही, त्यात किती शौर्य आहे, हे महत्त्वाचं आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

सरदार वल्लभभाई पटेल नुसते बोलणारे नव्हते, त्यांनी काश्मीर-पाकिस्तान-बांगलादेशचा प्रश्न मिटवला असता, असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram