मुंबई: फेरीवाल्यांच्या मारहाणीनंतर मनसेची तातडीची बैठक

मालाडनंतर विक्रोळीतही मनसे कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यानंतर
आता राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी तातडीची बैठक झालीय. मात्र मारहाणीनंतर मनसेनं पुढची भूमिका काय, हे अद्याप कळू शकलेलं नाहीय. दरम्यान, मारहाण प्रकरणी विक्रोळीच्या टागोरनगरमधील काँग्रेस चे अब्दुल अन्सारी आणि रिझवान नावाच्या व्यक्तीला अटक केली गेलीय. तसंच मनसेचे जयंत दांडेकर आणि किसन गायकर यांच्यावर अटकेची कारवाई झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola