मुंबई : हार्ट अटॅकची माहिती मिळणार, अगोदरच उपचार घेता येणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : अनेकदा आपल्याला हृदय विकाराचा आजार आहे हे जोपर्यंत हृदय विकाराचा झटका येत नाही तोपर्यंत कळत नाही. मात्र मुंबई आयआयटीने यावर एक नाम उपाय शोधत नवीन यंत्र तयार केलं आहे.
आपल्याला हृदय विकाराच्या धोक्याची पातळी कळावी आणि त्यावर उपचार तातडीने घेता यावे यासाठी मुंबई आयआयटीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यावर संशोधन करून एक नवीन यंत्र बनवलं आहे.
या यंत्राची किंमत जर तुम्ही विचारात असाल, तर अवघ्या दीड हजारात हे यंत्र तुम्हाला मिळू शकेल. या यंत्राच्या मदतीने आपण आपलं एक थेंब रक्त देऊन आपल्याला हृदय विकारासंदर्भातील धोक्याची पातळी कळू शकेल.
या यंत्राच्या मदतीने आपण आपल्या स्मार्टफोनवरही ही चाचणी करु शकतो.
बायोसायन्स आणि बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक सौम्य मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली देबास्मिती मोंडल आणि सौरभ अग्रवाल या दोन विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलं आहे.
आपल्याला हृदय विकाराच्या धोक्याची पातळी कळावी आणि त्यावर उपचार तातडीने घेता यावे यासाठी मुंबई आयआयटीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यावर संशोधन करून एक नवीन यंत्र बनवलं आहे.
या यंत्राची किंमत जर तुम्ही विचारात असाल, तर अवघ्या दीड हजारात हे यंत्र तुम्हाला मिळू शकेल. या यंत्राच्या मदतीने आपण आपलं एक थेंब रक्त देऊन आपल्याला हृदय विकारासंदर्भातील धोक्याची पातळी कळू शकेल.
या यंत्राच्या मदतीने आपण आपल्या स्मार्टफोनवरही ही चाचणी करु शकतो.
बायोसायन्स आणि बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक सौम्य मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली देबास्मिती मोंडल आणि सौरभ अग्रवाल या दोन विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलं आहे.