मुंबई : 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. कारण 23 जूनपासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणा-यांवर ही कारवाई होणार आहे..मात्र सर्वसामान्यांसाठीचा हा दंड 200 रु पर्यंत कमी करण्यात हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला आहे. त्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणा-यांवर 5000 रु दंड आकारला जाणार आहे. ..तर दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो..