मुंबई : खड्डे भरण्याची डेडलाईव पाळताना पालिकेची तारांबळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईकरांच्या नशिबात बिना खड्ड्यांचे रस्ते बघणं आहे की नाही हे देवाला ठाऊक. याचं कारणं मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे 48 तासात भरले जातील असा खणखणीत दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेची ड़ेडलाईन संपली. मात्र खड्डे काही भरले गेले नाहीत. बहुतांश ठिकाणांच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य कायम आहे. विक्रमी वेळेत खड्डे भरातना पालिकेच्या कर्मचाऱ्यांची अक्षरश: तारांबळ उडाताना बघायला मिळाली. त्यामुळे महापालिकेने केलेली खड्डे भुजवण्याची घोषणा खड्ड्यातच गाडली गेली असचं म्हणावं लागेल.