मुंबई : मुंबईसह नवी मुंबईत अनेक भागात वीजपुरवठा खंडित

Continues below advertisement
आज सकाळपासून मुंबई उपनगरासह, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी एक दिवसाचा वेळ लागण्याची शक्यता आहे.
महापारेषणच्या कळव्यातील सब स्टेशनमध्ये काल तांत्रिक बिघाड होऊन आग लागली...आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना सुरु झाल्या...य़ाच केंद्रातून महावितरणच्या ठाणे मंडळ आणि वाशी मंडळाला वीज पुरवठा होतो... मात्र बिघाडामुळे वीजेचा मोठा फटका नवी मुंबई आणि ठाण्याला बसलाय...वीज पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने आणि तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवलीय... महापरेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास किमान उद्यापर्यंत वेळ लागू शकतो. त्यामुळे आज पूर्ण दिवस उकाड्यात विजेविना घालवावा लागू शकतो..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram