मुंबई : भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

Continues below advertisement

भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत हल्लाबोल आंदोलन केलं. आझाद मैदानावर शरद पवार यांनी सभेला उद्देशून भाषण केले.

“महागाई वाढली आहे, संसार चालवणं कठीण झालं आहे. कारखाने बंद होऊन नवीन रोजगार मिळत नाही. कामगार वर्गावर अन्याय होत आहे. हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची होती ते असफल ठरलेत. आज लोक म्हणायला लागले आहेत की, आम्हाला अच्छे दिन नको, आमचे पूर्वीचे दिवस परत द्या.” असे म्हणत पवारांनी सरकारवर निशाणा साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram