मुंबईतील 4 हजार खड्डे बुजवल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बहुतांश भागात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे मुंबईत रस्ता नावाची संकल्पना अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सध्या मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची सरासरी संख्या लाखोंच्या घरात नक्कीच आहे. मात्र अद्यापर्यंत 4 हजार 44 खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.