मुंबई : जनतेशी संवाद साधण्यासाठी मुंख्यमंत्र्यांची कोट्यवधींची उधळपट्टी

एकीकडे राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर असताना दुसरीकडे मात्र जनतेशी संवाद साधण्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे आणि तेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून.

जय महाराष्ट्र, दिलखुलास आणि मी मुख्यमंत्री बोलतोय, या जनतेशी संवाद साधणाऱ्या कार्यक्रमासाठी तब्बल 4 कोटी 45 लाख रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे याला अर्थ विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola