मुंबई: मनसेच्या शिष्टमंडळाचं राज्यपालांना निवेदन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यात उच्च शिक्षण संस्थांच्या मुख्य पदांवर भूमिपुत्रांना डावलल्याचा आरोप करत मनसे आक्रमक झालीय. याविरोधात मनसेच्या शिष्ठमंडळाने राज्यपालांना निवेदन दिले आहे. तसेच VJTI च्या संचालकपदी नियम धाब्यावर बसवून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी मनसेने केली आहे. त्यासोबतच ऑनलाइन पेपर तपासणी घोळ, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा निधी पळवणे आणि केंद्राकडून शिक्षणासाठी येणाऱ्या निधीचं योग्य नियोजन करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीय.