मुंबई : औरंगाबाद पालिका आयुक्तांना हटवण्याची आमदार संजय शिरसाट यांची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबादमधल्या कचरा कोंडीला आयुक्तांना जबाबदार धरत त्यांना हटवा अशी मागणी स्थानिक आमदार संजय शिरसाट यांनी विधानसभेत केली आहे. औरंगाबाद कचराप्रश्नी शिवसेनेकडून स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबादमध्ये पोलिसांनी महिलावर अत्याचार केल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला. याशिवाय कचराप्रश्न सोडवायला अयशस्वी ठरल्यानं औरंगाबाद मनपा बरखास्त करा अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली.