मुंबई : कोरेगाव-भीमा षडयंत्र होतं, पुन्हा घडू नये त्यासाठी सतर्क राहा : मुख्यमंत्री

Continues below advertisement
"कोरेगाव भीमातील हिंसाचार हे मोठं षडयंत्र होतं. येणाऱ्या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे", असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आज मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

याशिवाय आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram