मुंबई : कुर्ल्यातील किनारा हॉटेल आग, दोन वर्षांनीही आश्वासनपूर्ती नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कमला मिल आगीप्रमाणेच दोन वर्षांपूर्वी कुर्ल्यामधील सिटी किनारा हॉटेल आगीनं धुमसलं होतं. यामध्ये 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतरही मृतांच्या नातलगांना दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी 2 वर्ष लढा द्यावा लागला. तर आर्थिक मदत म्हणून नातलगांना फक्त एक लाख रुपये देण्यात आले. मात्र अजूनही पीडितांना दिलेली इतर आश्वासनं सरकारनं पूर्ण केलेली नाहीत.