मुंबई : मराठा आरक्षणाबद्दल कामाची गती वाढवा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आयोगानं कामाची गती वाढवावी असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहे. वर्षभर प्रलंबित असलेल्या मुद्यावर आणखी किती वेळ लागणार? असा सवालही हायकोर्टानं विचारला होता. ३१ जुलैपर्यंत माहीती गोळा करण्याचं काम पूर्ण करणार अशी ग्वाही त्यावर राज्य सरकारनं हायकोर्टाला दिली. याप्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑगस्टला होणार आहे.
Continues below advertisement