उष्माघातापासून स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उष्णतेच्या झळांनी सध्या मुंबईसह महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. काल मुंबईत तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणि जगातल्या सर्वात उष्ण शहरांच्या यादीत मुंबई आठव्या स्थानी राहिली. तिकडं विदर्भातही तापमान तब्बल 3 ते 6 अंशांनी वधारले आहे. अकोल्याचा पारा तब्बल 40.5 अंश सेल्सिअस राहिला. रायगड जिल्ह्यातल्या भीरामध्ये तब्बल 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तिकडं तळकोकणातही काल तब्बल 42 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळं तापमानात ही कमालीची वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच येते 24 तास मुंबई आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं आज दिवसभर मुंबईकरांनी काही महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडू नये.