मुंबई : पहिल्याच पावसात हार्बर रेल्वेचं कंबरडं मोडलं, वाहतूक उशिराने

तळकोकणाला चिंब भिजवणाऱ्या पावसानं मुंबईच्या दिशेनं जोरदार मुसंडी मारलीय...सिंधुदुर्गापासून पावसानं आपली झलक दाखवण्यास सुरुवात केली...यानंतर मुंबई, सातारा, वर्धा, मनमाडमध्येही पावसानं आगेकूच सुरु केलीय...पहिल्याच पावसानं मुंबईकरांची मात्र त्रेधातिरपीट उडवलीय...वाऱ्यासह आलेलं पावसाचं पाणी मुंबईच्या अनेक भागात साचलं...तसंच हार्बरलाईनही काही काळ ठप्प झाली...दरम्यान येत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय..त्यामुळे इतकी दमदार सुरुवात करणारा पाऊस आषाढ आणि श्रावणात आणखी जोरदार वर्षाव करेल अशी आशा आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola