चायनीज फवारणी यंत्रांवर तातडीनं बंदी, संबंधित कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : मुख्यमंत्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2017 06:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्या कंपन्यांनी फवारणीचं मिश्रण चुकीचं बनवलं अशा कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसंच यवतमाळ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलत होते. फवारणीमुळे यवतमाळ, अकोला आणि नागपूरमध्ये मिळून तब्बल 34 शेतकऱ्यांचा जीव गेला. त्यानंतर सरकारनं ही घोषणा केली. ज्यांनी विषारी खतांची विक्री केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.