ABP News

Kisan Long March : मुंबई : शेतकरी प्रश्नी योग्य निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

Continues below advertisement
रक्ताळलेले पाय घेऊन 200 किलोमीटरची पायपीट केलेला बळीराजा अखेर आझाद मैदानावर धडकला. विविध मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईकडे पायी निघालेला किसान सभेचा मोर्चा आज पहाटे आझाद मैदानात दाखल झाला.

संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली आहे. खरंतर आज सकाळी ठाण्याहून मोर्चा मुंबईकडे निघणार होता, मात्र दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी त्रास सोसत रात्रीच आझाद मैदान गाठलं.

आज दुपारी आझाद मैदानावर शेतकऱ्यांची जाहीर सभा होणार आहे.

सोमय्या मैदानातून रात्री उशीरा मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाकडे कूच केली. परीक्षांच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोर्चेकऱ्यांनी रात्रीत कूच करण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram