मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत सेना-भाजप युतीचे प्रसाद लाड विजयी
Continues below advertisement
विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला आहे. लाड यांना 209 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. माने यांना 73 मतं मिळाली.
विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 9 मतं फुटल्याचं समजतंय. त्यामुळं पक्षाला दगा देणारे आमदार कोण याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा सुरु आहे.
नारायण राणे समर्थक कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचं उघडपणे जाहीर केलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान ‘पदुम’ राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना मतदान करता आलं नाही.
Continues below advertisement