मुंबई : भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, एकाही बॅनरवर फोटो नाही, कार्यकर्ते नाराज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक भाजपवर नाराज आहेत.
भाजपच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
''राज्यात भाजप पक्ष आहे, तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आहे, मात्र इथे आल्यानंतर त्यांचा फोटोच बॅनरवर नसल्याचं दिसलं. भाजपने बॅनरवर त्यांचा फोटो लावावा,'' अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली.
दरम्यान, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर मुंडे भगिनींनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.
भाजपच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
''राज्यात भाजप पक्ष आहे, तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आहे, मात्र इथे आल्यानंतर त्यांचा फोटोच बॅनरवर नसल्याचं दिसलं. भाजपने बॅनरवर त्यांचा फोटो लावावा,'' अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली.
दरम्यान, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नाराज कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं लक्षात आणून दिल्यानंतर मुंडे भगिनींनी मंचावरून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.