भारत बंद : मुंबई, पुण्यासह इतर शहरात जनजीवन सुरळीत

अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे देशभर अनेक ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि निदर्शनं सुरु आहेत. मात्र त्याची फारशी झळ महाराष्ट्राला बसलेली नाही.
कारण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधलं जनजीवन सुरळीत आहे. शिवाय बाजारपेठाही नेहमीप्रमाणे उघडल्याचं चित्र आहे. तसंच शाळा, कॉलेजांमधील परीक्षाही सुरळीत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola