मुंबई : आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू, मुंबईकरांच्या खिशाला कात्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Apr 2018 11:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईकरांच्या खिशाला आजपासून (गुरुवार) कात्री लागणार आहे. कारण, बेस्ट बसची भाडेवाढ आजपासून लागू होणार आहे.
मुंबई महापालिकेनं यापूर्वीच ही भाडेवाढ मंजूर केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. या भाडेवाढीत पहिल्या चार किलोमीटरपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र चार किलोमीटरनंतर एक रुपयापासून ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ सुचवण्यात आली आहे.
सोबतच विद्यार्थ्यांसह इतर पासच्या भाड्यातही चांगलीच वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
मुंबई महापालिकेनं यापूर्वीच ही भाडेवाढ मंजूर केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. या भाडेवाढीत पहिल्या चार किलोमीटरपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र चार किलोमीटरनंतर एक रुपयापासून ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ सुचवण्यात आली आहे.
सोबतच विद्यार्थ्यांसह इतर पासच्या भाड्यातही चांगलीच वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.