मुंबई : एल्गार मोर्चा : पंतप्रधान मोदी संभाजी भिडेंना पाठीशी घालत आहेत : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement
संभाजी भिडेंना 8 दिवसांत अटक न केल्यास विधानभवनाला घेराव घालू अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. संभाजी भिडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत आहेत असा घणाघाती आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. संभांजी भिडे यांच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी सरकारला 8 दिवसांचं अल्टीमेटम दिलं आहे.

सरकारने भिडेंना 8 दिवसात अटक न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. संभाजी भिडेंवर कारवाई झाली नाही तर कुठल्या शेपटीवर पाय द्यायचा, कोणतं प्रकरण कधी काढायचं हे आपल्याचा चांगलं ठावूक असल्याचा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram