मुंबई : दंगल नियंत्रणात आली का? शुद्धीवर येताच एसीपी गोवर्धन कोळेकर यांचा पहिला प्रश्न

Continues below advertisement
शहरात दंगल पेटल्यास राजकीय पुढाऱ्यांकडून नेहमीच पोलिसांवर टीका केली जाते. मात्र, औरंगाबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने जीवावर उदार होऊन दंगल नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्य बजावताना औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस स्टेशनचे एसीपी गोवर्धन कोळेकर हे गंभीर जखमी झाले.

स्वरयंत्राला दगड लागल्यामुळे कोळेकरांना बोलता येत नव्हतं, डॉक्टरांनी त्यांना डायरी देऊन लिहायला सांगितलं, त्यावेळी त्यांनी कागदावर जे लिहिलं ते पाहून उपस्थित असलेले त्यांचे सहकारी, डॉक्टर आणि कुटुंबीयही स्तब्ध झाले. 'रात्रीची घटना शांत झाली का?' हे पहिले शब्द त्यांनी लिहिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram