Mumbai Metro 3 | अवघ्या 19 महिन्यांत मुंबई मेट्रो 3च्या भुयारीकरणाचं 50 टक्के काम पूर्ण | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई मेट्रो 3च्या भुयारीकरणाचं 50 टक्के काम पूर्ण झालं आहे. अवघ्या 19 महिन्यांमध्ये मेट्रो प्राधिकरणाने 50 टक्के भुयारीकरणाचा टप्पा पार केला आहे. या मार्गासाठी एकूण 56 किमी (अप आणि डाऊन)चे भुयारीकरण करायचे आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ हा मुंबईच नव्हे तर भारतातील सर्वात लांब संपूर्णत: भुयारी मेट्रो मार्ग आहे.
भुयारीकरणाप्रमाणे खोदकाम, बेस स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब, कॉलम तसेच भिंतींची बांधणी यासारखी कामे देखील युद्धपातळीवर सुरु आहेत.

या भुयारीकरणाच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला अनेक वादांना तोंड द्यावं लागलं होतं. पूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो 3 मार्गिकेवर एकूण 27 थांबे असणार आहेत. या प्रकल्पाच्या एकूण 56 किलोमीटर भुयारीकरणाच्या कामापैकी जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram