माझा विशेष : निवडणूक आणि राजकारणात चर्चची लुडबुड कशासाठी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2018 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिल्लीतील कॅथलिक चर्चच्या मुख्य पाद्रींनी लोकशाही धोक्यात आल्याचं म्हणत मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. दिल्लीचे आर्चबिशप अनिल कोटो यांनी देशभरातील इतर चर्चच्या धर्मगुरुंना पत्र लिहून हा संदेश दिला आहे. लोकशाही धोक्यात आली असताना पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत. त्यामुळे आपण देशासाठी प्रार्थना अभियान सुरु करायला हवं, असंही कोटो यांनी म्हटलं आहे. संविधानाची लोकशाही तत्त्वं आणि निधर्मी रचनेला धोका निर्माण करणाऱ्या प्रक्षुब्ध राजकीय वातावरणापासून देशाला वाचवायला हवं, असं ते म्हणतात.