मुंबई : रायगडाला गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन : डॉ. अमोल कोल्हे
स्वराज्याची राजधानी असलेला 'रायगड' पूर्ववत कऱण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असा विश्वास अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर ते बोलत होते. रायगड हा पूर्ववत झाला तर जगातलं आठवं आश्चर्य महाराष्ट्राच्या मातीत असेल,असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.