उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यभरात बहुतांश शाळा सुरु

Continues below advertisement
नवीन कपडे, नवीन दप्तर सोबतीला नवे पुस्तकं वह्या आणि त्याचा येणारा सुगंध अशा प्रसन्न वातावरणात आजपासून महाराष्ट्रातील बहुतांश शाळा सुरु झाल्या. उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी काही शाळांनी जय्यत तयारी केली होती. राज्यभरातील शाळांमध्ये आज प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. बहुतांश शाळांमध्ये हारतुरे, फुले, फुगे देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram