माती विभागात पुण्याचा सागर मारकड 57 किलो गटात विजयी | महाराष्ट्र केसरी | जालना | एबीपी माझा
महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार सध्या जालन्याच्या आझाद मैदानावर सुरु आहे. या स्पर्धेत आज राज्य विजेतेपदाच्या लढती आज पार पडल्या. त्यात पुण्याच्या सागर मारकडनं माती विभागातल्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सागरनं अंतिम लढतीत कोल्हापूरच्या संतोष हिरगुडेचा १०-० असा धुव्वा उडवला