ठाणे : महावितरणच्या वायरचा शॉक लागून मुलीचा मृत्यू, नागरिकांचा मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2018 11:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाण्यात एमएसईबीच्या उघड्यावर पडलेल्या वायरचा शॉक लागून एका मुलीचा मृत्यू झाला. त्याच्यानिषेधार्थ लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांनी आणि मृत मुलीच्या पालकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं. सिद्धी गुप्ता या मुलीचा सोमवारी वायरचा शॉक लागून मृत्यू झाला होता. तिच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्याची मागणी सरनाईक यांनी यावेळी केली. तर, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार ४ लाखांची मदत देण्याचे जाहीर केले असून संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.