Ganeshotsav 2019 | पाणी टंचाईचा गणेश विसर्जनाला फटका, गणेशमूर्ती दान करण्याची जिल्हाधिकाऱ्यांती विनंती | ABP Majha


लातूरमधील दुष्काळ यंदाच्या गणपती विसर्जनावर विघ्न म्हणून समोर आलाय. कारण, गणपती मूर्ती विसर्जित करण्यासाठी लातूर शहरात यंदा पाणीच नाही. जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती कुठे विसर्जित करणार, हा प्रश्न लातूरमधील मंडळांसोबतच नागरिकांनाही पडलाय. त्यावर उपाय म्हणून यंदा गणेशमूर्ती विसर्जित न करता, दान करा, अशी विनंती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेशमंडळं आणि लातूरकरांना केलीय. लातूरमध्ये सप्टेंबर अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लातूरकरांना पुन्हा एकदा मोठ्या पाणीसंकटाला सामोरं जावं लागणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola