Ganeshotsav 2019 | पाणी टंचाईचा गणेश विसर्जनाला फटका, गणेशमूर्ती दान करण्याची जिल्हाधिकाऱ्यांती विनंती | ABP Majha
लातूरमधील दुष्काळ यंदाच्या गणपती विसर्जनावर विघ्न म्हणून समोर आलाय. कारण, गणपती मूर्ती विसर्जित करण्यासाठी लातूर शहरात यंदा पाणीच नाही. जिल्ह्यातील सर्व नदी-नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती कुठे विसर्जित करणार, हा प्रश्न लातूरमधील मंडळांसोबतच नागरिकांनाही पडलाय. त्यावर उपाय म्हणून यंदा गणेशमूर्ती विसर्जित न करता, दान करा, अशी विनंती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेशमंडळं आणि लातूरकरांना केलीय. लातूरमध्ये सप्टेंबर अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लातूरकरांना पुन्हा एकदा मोठ्या पाणीसंकटाला सामोरं जावं लागणार आहे.