कोल्हापूर : 'पाच बळी गेलेल्या रस्त्यांवरुन पाच लाख लोकांनीही प्रवास केला' - चंद्रकांत पाटील

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न केलाय. कल्याणमध्ये ज्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळं पाच जणांचे बळी गेले त्याच रस्त्यावरुन पाच लाख लोकांनी प्रवासही केला असं अजब वक्तव्य मंत्र्यांनी केलं आहे. रस्त्यांसाठीचा सर्वच दोष शासनावर टाकता येणार नाही असं म्हणत त्यांनी सर्व जबाबदारी मुंबई महापालिकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola