कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सात गावांचा संपर्क तुटला

Continues below advertisement
कोल्हापुरात जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 34 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तिकडे झांबरे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेल्यानs चंदगड गोवा मार्ग ठप्प झाला आहे. यामुळं चंदगड तालुक्यातील सात गावांचा संपर्क तुटला आहे. अणुस्कुरा घाटातही मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram